केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी कायदा या योजनेचे केंद्र सरकारने नाव बदलले असून आता ही योजना पू.बापू रोजगार हमी कायदा अशा नावाने ओळखली जाईल
महात्मा गांधी रोजगार हमी योजना या योजनेस तत्कालीन काँग्रेस प्रणित यु पी ए सरकार ने कायद्याचे स्वरूप देत ग्रामीण भागात गावातच किमान १०० दिवस रोजगार मिळावा ही हमी दिली होती मात्र आता नाव बदलल्या योजनदत भाजप प्रणित एन डी सरकार ने १२५ दिवस रोजगाराची हमी दिली आहे हो मागील योजनेच्या तुलनेत २५ दिवस अधिक आहे.
एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजने वर टीका करतांना हीयोजना म्हणजे “काँग्रेस च्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे” असे म्हटले होते तेव्हा ही योजना बंद होते की काय असे वाटले होते.मात्र या योजनेला कायद्याचे रूप असल्याने ते जवळपास अश्यक्य व कठीण असल्याचे पाहून आता नाव बदलून रोजगार दिवस वाढवण्यात आले आहे.
या योजनेत केंद्र सरकार आपला हिस्सा देत असते मात्र राज्यात झालेल्या कामाचे पैसे अद्याप केंद्र सरकार ने दिले नसल्याने शेतकरी च्या सिंचन विहिरीचे देयक रखडले आहे.
योजनेचे नाव काहीही ठेवा मात्र ती राबवण्यासाठी राज्य सरकार ला निधी द्यावा असा सूर निघत आहे.
