उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला आता डेडीकेट तू कॉमन मॅन डी.सी.एम.म्हणतात ते मुख्यमंत्री असताना स्वराला कॉमन मॅन म्हणत होते..
त्यांच्यावर”अनाथांचा नाथ” या गाण्यातील ओळी
“संकटात पाय रोवूनी, एकला उभा ठाकतो” —. आज अक्षरशः सार्थ ठरल्या. असे मत शिवसेना पश्चिम विदर्भ समनव्यक पपरागभाऊ पिंगळे यांनी व्यक्त केले.
दुबईमध्ये अडकलेल्या यवतमाळच्या ५ कुटुंबियांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. ही केवळ मदत नाही, तर खरी माणुसकी आहे. असेही परागभाऊ पिंगळे यांनी म्हटले आहे .
या विशेष विमानातून महाराष्ट्रातील तब्बल १६४ प्रवासी, जे दुबई येथे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे विमाने रद्द झाल्याने अडकले होते, त्यांनाही सुरक्षितपणे परत आणण्यात आले.
प्रवासी सुखरूपपणे बंगलोर येथे पोहोचले असून पुढे त्यांना मुंबईला आणले जात आहे याविषयी माहिती बाळासाहेब दौलतकर ह्यांनी परागभाऊ पिंगळे यांना दिली.
. नागपूरच्या प्रवाशांसाठी मुंबईनागपूर विमान तिकिटांचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे देखील कळते
संकटाच्या काळात लोकांसाठी धावून जाणारा नेता म्हणजेच खरा नेता
हीच खरी नेतृत्वाची ओळख — निर्णयक्षमता, जबाबदारी आणि माणुसकी असेही पराग पिंगळे यांनी नमूद केले.
