औद्योगिक परिसरात कामगारावर उपासमारीची वेळ;अमेरिका इराण युद्धाचे परिणाम भारतात .!
रांजणगाव (पुणे) येथे मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे त्यामूळे येथे मोठ्या प्रमाणात विदर्भ,खानदेश , मराठवाडा येथून तरुण तरुणी येत असतात पण सध्या चालू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संघर्षामुळे सध्या खानावळ आणि हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे त्यामुळे जे तरुण तरुणी कामाकरिता या परिसरात आले आहेत त्यांच्या जेवण्याचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे कंपनी मध्ये १ वेळ जेवणाची सोय आहे परंतु कामावरून घरी गेल्यानंतर बऱ्याच खानावळ आणि हॉटेल बंद असल्याकारणाने सध्या कामाकरिता आलेले कामगार उपस्मारीच्या भीतीने आपल्या गावाकडे जात आहे याचा परिणाम उद्योग धंद्यावर होत असून अपुऱ्या मनुषबळामुळे उद्योग धंद्यावर याचा फार मोठा परिणाम होईल यात तिळमात्र शंका नाही