बोरी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आर्णी च्या वरच्या दिशेने बायपास आहे त्यामुळे आर्णी च्या अरुणावती नदीवर मोठा पूल आहे.
मात्र आर्णी वरून बाबा कम्बलपोष दरगाह, शिव सिद्धेश्वर मंदिराला व दिग्रस जाण्यासाठी जुन्याच पुलाचा वापर होतो.
आता फेब्रुवारी महिन्यात बाबा कंबलपोष उर्स, यात्रा महोत्सव असतो यावेळी लाखो भाविक येतात त्यावेळी अरुणावती नदी वरील जुन्या पुलाचा वापर होतो.
या वर्षी अति वृष्टी मुले अरुणावती नदी ला अनेकदा पूर आला पुराचे पाणी पुला वरून गेल्याने पुलाला बसविलेले लोखंडी सुरक्षा कठडे वाहून गेले.
जुना पूल अरुंद असल्याने यावरून आता वाहतूक धोक्याची झाली आहे.
पुलावर लोखंडी सुरक्षा कठडे बसवावे अशी मागणी होत आहे.
previous post
