Bol Maharashtra
निवडणूक महाराष्ट्र राजकारण

५०% आरक्षण मर्यादा ओलांडली आता तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका..?

राज्य निवडनुक अयोगा कडून प्राशासकिय चूक अंगलट येत असून recerveshation मर्यादा ओलांडून असल्याने काही जिल्हा परिषदेच्या निवडनुका दुसर्या टप्प्यात होइल अशी श श्यक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी कोर्टाने या पुढच्या कोणत्याही निवडणुकीत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असे सांगितले होते. त्यामुळेच त्याचे नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. ५० % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला १५ जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित १७ जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related posts

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

bol maharashtra

धक्कादायक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन…!

bol maharashtra

दुर्गा ब्रिगेड पक्षाची शिक्रापूर येथे पत्रकार परिषद संपन्न..!

bol maharashtra