महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली यामुळे राज्यात हळहळ व्यक्त झाली आहे.
आज सकाळी जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा विश्वास बसत नव्हता.मात्र जेव्हा ही घटना सत्य असल्याचे कळताच मग दुःख सागरात राज्य बुडाले.
मनाने निर्मळ रोखठोक, बेधडक असा नेता हरवला अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या.वेळेचे महत्व जाणत कामाचा धडाका यामुळे ते सदैव स्मरनात राहतील.
उद्धस्त या तिन शब्दात खा.सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हा परिषद निवडणुकी च्या बैठकी साठी दादा सकाळीच मुंबई वरून बारामती विमानाने जात होते तेव्हा विमान क्रॅश झाले व कोसळत स्फोट होऊन पेट घेतला यात दादा सोबत सहा व्यक्ती चा मृत्यु झाला.
बोल महाराष्ट्र पोर्टल च्या वतीने अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
