भक्तिमय वातावरणात भगवान शंकरजी यांचे मूर्तीची मुक्तीधाम मध्ये स्थापना
*लोकवर्गणी मधुन साकारली मूर्ती
आर्णी:तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत मधिल स्मशानभूमीत भगवान शंकरजी यांचे मूर्तीची मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील मूलभूत सुविधाचा विकास होण्याचे दृष्टीने ग्रामस्थांनी लोक वर्गणी करून परसोडा येथे भगवान शंकरजी यांचे मूर्तीची गावातून भजन मंडळीने वाजत गाजत मोठ्या भक्तीभावाने मिरवणूक काढून स्मशान भूमी येथे विधिवत पूजा करूनसरपंच प्रा स्वप्ना अतुल पाटील देशमुख व माजी सरपंच अतुल पाटील देशमुख ह्या उभयंत्याच्या हस्ते स्थापना करण्यात आली ह्यावेळी उपसरपंच सुनंदा पत्रे,विठ्ठल देशमुख, अरुण देशमुख, सुदर्शन देशमुख, रमेश कोल्हे, ज्ञानेश्वर मिसाळ, शंकर कोल्हे, पंकज राठोड,संदिप राठोड,संतोष पत्रे, संतोष चौधरी, प्रकाश पत्रे, नारायण सोळंके, नारायण गुडे, कैलास जाधव, संजय पारधी, दत्ता पारधी, भगवान पोटे, अर्जुन पवार, विठ्ठल पारधी, वसुसेव पत्रे, आदित्य देशमुख, ओम पारधी,मंदाबाई कोल्हे, स्वाती पत्रे, कमलाबाई जुडे, पंचफुला गुडे नलू पारधी यांचे सह शेकडो गावकरी यांची उपस्थिती होती.
