आर्णी विभागातून १०० धारकरी मोहिमेसाठी रवाना
दिनांक २२ जानेवारी रोजी आर्णी विभागातील १००+ धारकरी लोहगड ते राजमाची गड होणाऱ्या धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले यावेळी शहरातील अनेक नागरिकांनी त्यांचा सत्कार केला, व शहरातील शिवनेरी चौक या ठिकाणी शिवरायांचा प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले व प्रवासाला सुरुवात झाली, मोहिमेला जाणाऱ्या सर्व धारकऱ्यांचे मोहिमेला निघताना औक्षण झाले आणि धारातीर्थ गडकोट मोहिमेची सुरुवात झाली.
गेल्या ५ वर्षांपासून आर्णी विभागातून धारकरी मोहिमेसाठी जात आहे पहिल्या वर्षी १ दुसऱ्या वर्षी २ तिसऱ्या वर्षी ८ चौथ्या वर्षी ४० तर यावर्षी मोहिमेसाठी आर्णी विभागातील १०० पेक्षा अधिक धारकरी जात असून तालुक्यातील वरूड मधून ४० तर जवळा, सुकळी, तळणी, विठोली, चिखली सह अनेक गावातील धारकरी मोहिमेसाठी रवाना झाले.
सर्व धारकऱ्यांना मोहिमेला पाठविण्यासाठी शहरातील अनेक हिंदू बांधव शिवनेरी चौकात उपस्थित होते.
