आर्णी तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी ने आधीच संकटात असतांना तालुक्यातील विठोली (बोरगाव) येथील शेतकरी पुरुषोत्तम इंगळे यांच्या दोन एकर शेतातील कापनीला आलेला परिपकव ऊस जळून खाक झाला ही आग शॉट सर्किट मुळे लागल्याची श्यक्यता व्यक्त होत आहे.
आधीच अतिवृष्टी ने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला त्याचा शासकीय मोबदला देखील मिळाला नाही त्यात ऊस जळण्याचे संकट यामुळेच शेतकरी पुरुषोत्तम इंगळे हवालदिल झाले आहे शासनाने त्वरित पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
