शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात विविध अभियान असतात ज्यात जनतेचा लाभ असतो पण अशा योजना व अभियानाची योग्य माहिती लोकांना माहीत होणे आवश्यक असते.
असेच महाराष्ट्र शासनाने पंचायत राज अभियानात गृह व पाणी क्राचे शुल्क एकाच वेळी भरणा केल्यास ५०% कर माफी ची योजना आहे.
आर्णी तालुक्यातील ग्रामपंचायत आसरा येथे या अभियाना बाबत ग्रामपंचायत सचिव प्रशांत गजभिये यांनी खारोडे गटविकास अधिकारी आर्णी पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनात गावात कर माफी बद्दल माहिती दिली.
कर माफी चा लाभ घेऊन करमुक्त होऊन ग्रामपंचायत च्या विकासास हातभार लावावे असेही प्रशांत गजभिये यांनी नागरिकांना सांगितले.
