जि.प.सदस्याप्रमाणे पं. स. सदस्यांना राखीव विकास निधी व विधान परीषदेचा मतदार बनविणे व मतदानाचा हक्क देण्यासाठी आर्णी येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेते व भारतीय जनता युवा मोर्चा चे माजी जिल्हा सचिव विजयसिंह राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करत मागणी केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प.स. गणातुन १५ त २० गावे सांभाळावी लागतात प.स. गणातुन निवडुन दिलेल्या पं. स. सदस्याकडुन विकास कामाची नागरीक अपेक्षा करतात परंतु त्या भंग होतात. त्यामुळे लोकांनी निवडुन दिलेल्या सदस्यावर व त्या पक्षावर तिव्र नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे आपणास नम्र विनंती की पं. स. सदस्यांना वार्षीक ५० लक्ष रू निधी देण्याची तरतुद करून प.स. गणाला व सदस्याला न्याय दयावा.
अतिमहत्वाचे म्हणजे जि.प. सदस्य, व प.स.सभापती व नगरसेवक हे स्थानीक स्वराज्य संस्थेचे मतदार असतात व ते विधान परीषदेच्या उमेदवाराला मतदान करतात. तर मग प.स.सदस्य जे १५ ते २० गावातुन निवडुन येऊन १५ त २० गावाचे नेतृत्व करतो. तो सुध्दा लोकप्रतिनीधी असुन त्यालाही जि.प. सदस्य, नगर सेवक, व प.स. सभापती प्रमाणे मतदार म्हणुन नोंद करावी ही विनंती करण्यात आली आहे.
