मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची देवराव पाटील शिंदे कॉलेज कडून पथनाट्या द्वारे जनजागृती
आर्णी :परसोडा ग्रामपंचायत द्वारा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असून ह्या अभियानाची माहिती व जनजागृती करणे संदर्भात देवराव पाटील शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय द्वारे पथनाट्या द्वारे ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.
गाव विकासा सोबत ग्रामस्थ्यांच्या समस्या सोडून त्यांना सुविधा मिळाव्या ह्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने परसोडा ग्रामपंचायत व देवराव पाटील शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय द्वारे पथनाट्या चे माध्यमातून जनजागृती करण्यात आली ह्यात देवराव पाटील शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका मेघना शिंदे ह्यांचे कल्पनेतून पथनाट्याची संकल्पना मांडली तरप्रथम काकोरवार, गौरव बेले, गणेश गावंडे, गौरव सोनुलकर, समृद्धी खराटे, विनायक भालेराव, देवा राठोड, पायल राठोड ह्या विध्यार्थी सहभागी झाले होते तर ह्यावेळी सरपंच प्रा सौं स्वप्ना अतुल देशमुख, माजी सरपंच अतुल पाटील देशमुख,मुख्याध्यापक बाबाराव वानखडे,सर, अरुण देशमुख, शंकर कोल्हे, ज्ञानेश्वर मिसाळ, गजानन शेळके,कैलास जाधव,नारायण सोळंके,प्रफुल जाधव,रामेश्वर पत्रे,आदित्य देशमुख, राम कोल्हे, सौं पूजा देशमुख, आशा देशमुख, सुनिता देशमुख, अनुसया पत्रे, आशा सोळंके, स्वाती पत्रे, विठ्ठल पारधी, सिताराम काळे, भगवान सोळंके यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी दिग्विजय मुंडवाईक यांनी माणले.
