कर आकारणी जैसे ते ठेवा
आर्णी नगर परिषदेने सन २०२६ पासून तिप्पट चौपट मालमत्ता कर आकारणी केली आहे, ओल्या दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर जाम अडचणीत आहे, व्यापार उदिम ठप्प आहे, ह्या भीषण परिस्थितीत केलेली करवाढ असह्य आहे.
नवनिर्वाचित नगरसेविका सौ प्रिती योगेश शिवरामवार ह्यांनी जनतेचे नगराध्यक्ष श्री नालंदा भरणे ह्यांना निवेदन देऊन प्रशासकीय काळात केलेली असह्य करवाढ रद्द करून जुन्या आकारणी नुसार कर संकलित करण्याचा ठराव पहिल्याच सभेत घेण्याचा आग्रह केला आहे
शहरात निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे दिलेल्या निवेदनात कर निर्धारण पूर्वी प्रमाणे करावे,कर निर्धारण.करणाऱ्या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर कधी दिली ती सभेच्या पटलावर ठेवणे,किती देयके अदा केले ती माहिती सभागृह पटलावर मांडावे अशा मागण्या निवेदनातून म्हटले आहे.
