शिवसेना आर्णी तालुका महिला आघाडी प्रमुख अश्विनी ताई देशमुख ह्या शिवसेनेच्या लढाऊ रणरागिणी ठरत आहेत त्या सातत्याने सार्वजनीक प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न सोडवत असतात..
आर्णी च्या शवं विच्छेदन केंद्रा चा प्रश्न असो की हिंदू स्माशान भूमी,कब्रस्थान चा प्रश्न त्या सातत्याने लावून धरतात. निवेदन देऊन त्या बाबीचा पाठपुरावा करतात शेवटी या शिवसेनेच्या रणरागिणी ची दखल प्रशासनास घ्यावी च लागते
आर्णी तालुक्यातील उमरी इजारा या गावी जाणारा रस्त्या सुस्थित नव्हता म्हणून अश्विनी ताई देशमुख यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले होते एव्हढेच नाही तर आमदार प्रा.राजू तोडसाम यांचा ताफा अडवला होता त्यावेळी प्रश्न निकाली काढू हा शब्दच त्यांनी घेतला होता.
आता हा रस्त्या तयार करण्यात येत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
