आर्णी येथील तालुका कृषी कार्यालयात भ्रष्टाचाराणे कळस गाठला असून सर्व सामान्य शेतकरी हिताच्या योजनेत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे मात्र या प्रकारा कडे जिल्हा कृषी अधिकारी देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने या विभागात चालणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेल चे जिल्हा अद्यक्ष विजय राठोड यांनी केली आहे या तक्रारींत त्यांनी सन २०२०-२१ साली आर्णी तालुका कृषी कार्यालया कडून झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून या विभागाचे कडून यांत्रिकी कृषी सहित्य वाटपात शेतकरी वर्गा कडून भरमसाठ रकमा घेतल्या चा आरोप करण्यात आला आहे
विभागिय कृषी आयुक्त,तसेच आमदार रोहित पवार यांना देखील तक्रार सादर करण्यात आली आहे.
आता या प्रकरणी काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
