Bol Maharashtra
क्रिकेट खेळ

खेळातून शिस्त व संघभावना विकसित व्हावी:आमदार प्रा.राजू तोडसाम…!

मैदानी खेळातून युवकां मध्ये शारीरिक व मानसिक दृढता येते व मैदानी ससामन्यातून संघ भावना व शिस्त विकसित होते असे प्रतिपादन आर्णी केलापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू भाऊ  तोडसाम यांनी व्यक्त केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतील ओपेरेन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन चे ठाणेदार निलेश सुरडकर व आर्णी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्याचे ( ए.पि. एल) आर्णी प्रीमियर लीग चे उद्घाटन आमदार राजु भाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा उपस्थित मान्यवर व खेळाडू यांच्या सोबत ते संवाद साधत होते.

यावेळी आर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर,अंजली ड्रेसेस चे संचालक राजेश श्रीवास सर्व  अधिकारी कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठ्या उत्साहात आर्णी पोलिसांनी आयोजित सामान्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला .यावेळी जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे माजी अद्यक्ष विलास पाटील राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत पाटील गावंडे व भाजप कार्यकर्ते पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते.

 

Related posts

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra

भारतीय संघाचा विजयी श्री गणेशा,मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश…!

bol maharashtra

खेळाडूंसाठी जयहिंद मंडळाची भूमिका कौतुकास्पद:ना.संजय भाऊ राठोड

bol maharashtra