रस्ते दुरुस्ती सह पाणीपुरवठा कार्यान्वित करण्याचे नव्या नगरपरिषद सदस्यां पुढे आव्हान…!
नवसाने झालेल्या बाळाचे जसे कौतुक असते तसे नवल आर्णी च्या पाणीपुरवठा योजनेचे आहे
रखडून रखडून वादात ठेऊन ४२ कोटी ची योजना ७४ कोटी वर गेली अन ती मंजूर झाली तिची सुरू होण्याची प्रक्रिया ‘प्रशासक राज’ मध्ये। पार पडली
शहरात पाण्याची भली मोठी टाकी बांधली
पाईप लाईन चे काम नळ कनेक्शन चे लहान पाईप टाकून पूर्ण झाले आता चाचणी (टेक्सटिंग) I’ve आहे पाणी मिळते की नाही हे काळच ठरवेल.
शुद्ध चोवीस तास पाणी मिळणार आहे म्हणून नागरिक चातका सारखी वाट पहात आहेत
त्यात या कामासाठी रस्त्याची चाळणी झाली रस्ते करायला कोट्यवधी रुपये लागतील
रस्ते करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेच्या प्राकलनात तरतूद असल्याचे वरवर कळते
म्हणून चोवीस तास शुद्ध पाणी देण्या सोबत रस्ते बांधकाम करून देणे हे मोठे आव्हान नवनिर्वाचित नगर परिषद पदाधिकारी यांच्या समोर असणार आहे.
सी सी टीव्ही वृक्ष लागवड,कचरा डेपो,मोकाट जनावरांचा बंदोबस्त अशी मोठी यादी आहे
आता प्रतीक्षा नवीन कार्यकारणी निवडून येऊन कारभार करण्याची
previous post
