आर्णी चे सर्वधर्म समभावा चे प्रतीक बाबा कंबलपोष दरगाह शरीफ ला जाणारा अरुणावती नदी वरील मुख्य पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे पावसाळ्यात पुरा मुळे वाहून गेल्याने पुलावर अपघाताची श्यक्यता आहे व यात्राही उर्स जवळ आहे त्यामुळे येथील संरक्षक कठडे बसविण्यात यावे अशी मागणी आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार परवेज बेग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आर्णी चे उप अभियंता यांचे कडे लेखी निवेदनातून केली आहे.
लवकरचं कठडे बसविण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पांडे यांनी दिल्याची माहिती आहे.
