महाराष्ट्र शासनाने सर्व विभागाचा समन्वय साधंत जनतेची कामे एकाच ठिकाणी जलद गतीने व्हावीत म्हणून महसूल मंत्रालय राज्य सरकार च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियान राबविण्याचे ठरविले आहे.
या अभियानात महसूल कृषी,पंचायत समिती, विज वितरण, व सर्व शासकीय योजनेच्या संदर्भात जनतेची कामे होणार असून या अभियानाचा लाभ लाभार्थी व जनतेने घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांचे मार्गदर्शनात आर्णी चे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांनी केले आहे.
विशेष म्हणजे हे अभियान आर्णी तालुक्यातील महसुली मंडळ निहाय आयोजित करण्यात आले असून त्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी न होता कामे झपाट्याने होतील व नागरिकांना होणारा त्रास देखील वाचणार आहे
आर्णी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियाना ची माहिती खालील प्रमाणे आहे.


