यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील विविध भागांतील पाणीपुरवठ्याची स्थिती, उपलब्ध जलस्रोतांचा वापर तसेच टंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने व प्रभावी कृती करण्याच्या स्पष्ट सूचना देत नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



