बिना केटेगरी साहित्यटोळी कुठं सुरक्षित रहाते भडे गेल्यावर, कवी विजय ढाले यांची अप्रतिम रचना..! by bol maharashtra19/04/202660 Share0 काय करता काचाचे त्या, तडे गेल्यावर टांगता कुठे इज्जतीचे, मढे गेल्यावर जपून ठेवा एकतरी पाठीराखा आपला टोळी कुठे सुरक्षित राहते, भडे मेल्यावर फितुरीत जींकल्या का लढाया कोणत्या सत्त्याचाच ‘विजय’ नैतिक लढे केल्यावर चौकिदारावर लक्ष ठेवण्या नेमा चौकिदार पाण्यावाचून मालक मरते तळे पिल्यावर नैतिकतेचा दर्जा जीच्या हातामध्ये आहे बाजी लावून शिल न्यारे, खरे शेल्यावर चारित्र्याचे शाबूत ठेवा वलय भोवताली चंद्र सुद्धा धुसर दिसतो , कडे केल्यावर