**माढा ता. प्रतिनिधी – दिपक लांडगे**
माढा तालुक्यातील कोंढारभाग परिसरात अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या केळी व डाळिंब बागांची आज सोलापूर जिल्हाधिकारी **श्री. एस. कार्तिकेन** यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच पंचनामे करून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यात मंडल अधिकारी **मुंडे साहेब**, तलाठी **बोराटे साहेब**, **पाटील साहेब**, **बाळू कांबळे**, **गुटाळ भाऊसाहेब**, केळी उत्पादक **जितेंद्र गायकवाड**, **राजेंद्र पाटील**, **अमोल देवकते**, **उद्धव केचे** तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देत शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
